Saturday 17 August 2019

भाषा चायनीज, शिक्षण पाकिस्तानी

मागील वर्षी सर्व न्युज चॅनेल यांनी एक बातमी प्रसिध्द केली. पाकिस्तान मधील सिंध सरकारने चायनिज भाषा शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सिंधचे मुख्यमंत्री कय्युम अली शाह आणि शिक्षणमंत्री पिर मजहरुल हक यांनी घेतला. 2013 पासून हा निर्णय सिंध राज्यात सुरु झाला आणि  हळूहळू संपूर्ण पाकिस्तानमध्ये ही भाषा सहावीच्या विद्यार्थ्यांपासून शाळे मध्ये शिकवायला सुरूवात करणार आहेत.

आपण हे वाचून म्हणाल त्यामध्ये एवढे महत्वाचे काय? भारतामध्ये कितीतरी शाळेमध्ये फ्रेंच भाषा शिकवली जाते, जर्मन शिकवली जाते पण आपण समजुन घेतले पाहिजे की, भारतामध्ये कुठलीही परकिय भाषा (इंग्रजी वगळता) अनिवार्य शिकवली जात नाही. पाकिस्तानी सरकारने चायनीज भाषा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना सहावीपासून त्यांच्या प्रत्येक शाळेत शिकवायचे अनिवार्य केले आहे. म्हणून हा महत्वाचा निर्णय.
या निर्णयामागचा  राज्यकर्त्यांचा काय उद्देश्  असेल ह्याचाही विचार करणे आवश्यक आहे. पाकिस्तानमध्येच भारतासारखे भरपूर इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. तिथील मुलं इंग्रजी भाषा शिकतात. पण सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये चायनिज भाषा अनिवार्य का? पाकिस्तान सरकार "पर्यायी भाषा" म्हणून ठेवू शकत होते. जसे आपल्याकडे फ्रेंच, जर्मन, संस्कृत भाषा या पर्यायी आहेत. अनिवार्य करण्या मागे काय कारणे आसवित ते पाहू.

चायना ज्या पद्धतीने जगा पुढे येत आहे आणि त्यातून एक बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करीत आहे. टाचणी पासून ते विमानापर्यंत प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ही ‘मेड इन चायना’ आहे. ही सर्व प्रगती त्यांनी त्यांच्या मातृभाषेच्या जोरावर केली.
जगातले सर्व तंत्रज्ञान, तत्वज्ञान आणि जगातील सर्व विज्ञान त्यांनी त्यांच्या मातृभाषेत आणले आणि मग प्रत्येक वस्तूची निर्मित्ती करून जगातले बहुतांशी मार्केट काबीज केले. आपण पाहतो अशी कुठलीही वस्तू नाही जी ‘मेड इन चायना’ नाही.
चायना इंग्रजी शिकले नाही आता ते त्यांची भाषा दुसर्‍या देशात ते शिकायला प्रवृत्त करतात. पाकिस्तानमध्ये चायनिज भाषा शिकवणे हा निर्णय एकटा पाकिस्तान सरकारचा की चायना सरकारी ची पण इच्छा आहे हे त्यांनाच माहित.
भारत चीन संबंध नाजूक आहेे. चिन बरोबर भारताचे एक युध्द झाले आहे आणि पाकिस्तान बरोबर सुध्दा.. आणि पाकिस्तान सरकार चिन बरोबर संबध घट्ट करण्यासाठीचे “चायनिज भाषा शिकणे” हे पहिले पाऊल आहे असे मत पाकिस्तानी राज्यकर्ते देत आहेत.
चीन व पाकिस्तान दोन्ही आपले शेजार राष्ट्र आहे. पाकिस्तान भूमिचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी होत असतो, अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा आहे. अमेरीकेने पाकिस्तन विविध प्रकारे मदत केली असली तरी  आता अमेरीकेला पाकिस्तान नकोशे झाले आहे. याचमुळे का पाकिस्तान सरकार चायनी भाषा शिकायचे ठरवते आहे? का पाकिस्तान मधील बेरोजगारी कमी करण्यासाठी चायनिज भाषा शिकायला अनिवार्य करीत आहे? का चीन मधील सर्व अद्यावत तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी प्रत्येक शाळेत सहावीपासून मुलांना ही भाषा अनिवार्य करीत आहे? काय कारणे असली पाहिजे?
आता तरी पाकिस्तान सरकार म्हणंतय की स्कॉलरशिप मिळविण्यासाठी आम्ही मुलांना ही भाषा शिकवत आहे. पण मग मुळ मद्दा हा येतो की ही भाषा पर्यायी ठेवावी, अनिवार्य करु नये. कारण तेथील शैक्षणिक परिस्थिती भारतापेक्षा बरीच वाईट आहे.
भारतामधील शालेय विद्यार्थ्यांना अजून शाळेत निट इंग्रजी बोलता येत नाही. मग तेथील मुलं इंग्रजी बरोबरच चायनिज या दोन-दोन परकीय भाषा कशा शिकतील? त्यात जगातील सर्वात अवघड भाषा म्हणजे चायनिज भाषेशी ओळख आहे. तेथील मुलांना उर्दू, अरेबी, सिंध या पण भाषा शिकायचे आहेतच ना.. मग हेच अधिक बोजे ते अनिवार्य का?
कदाचित असेही असू शकतं की, अमेरीका, ऑस्टे्रलियापेक्षा चीन मधील उच्चशिक्षण हे अधिक स्वस्त असू शकतं आणि हे “स्वस्त: उच्च शिक्षण” पाकिस्तनामध्ये येणार्‍या पिढीला घ्यायचे असेल तर चायनिज भाषा येणे हे अनिवार्य आहे.
पाकिस्तान अधिकच कर्जात बुडालेला देश आहे. भविष्यात उच्च शिक्षणासाठी त्यांना दुसर्‍या विकसीत देशावर अवलंबून  राहणे गरजेचे आहे. त्यात गेल्या काही वर्षात पाकिस्तानी नागरीकांना अमेरीका आस्ट्रेलियामध्ये संशयानेच पाहिले जाते. म्हणून कदाचित चीनवर अवलंबून राहयाची वेळ आली तर त्यांची भाषा येणार्‍या पाकिस्तानी पीढीला माहिती पाहिजे. म्हणून त्यांच्या सरकारने चायनिज शिकणे अनिवार्य येणे असेल.
कारणं काहीही असो, पण भारतातील शिक्षण मंडळाला हे सुचले नाही की, शाळेपासून चायनिज भाषा अनिवार्य नाही पण पर्यायी ठेवावी. कारण भारत या गोष्टीकडे अधिक विधायक दृष्टिकोनातून बघू शकेल. परकिय भाषा शिकण्याच्या प्रामाणिक उद्देश विकासासाठीच करावा हे भारत करू शकेल. शंका थोडी पाकिस्तान बद्दल आहे.
शेवटी शिक्षणाचा उद्देश हा रोजीरोटी कमविण्याबरोबरच एक चांगला माणूस घडावा हा आहे. चायनिज भाषा शिकून येत्या 20 वर्षानंतर पाकिस्तान मधील रोजी रोटीचा प्रश्‍न सुटत असेल तर तेथील पीढीला उत्तमच आहे.
चायनिज शिकून पाकिस्तानामध्ये विकासासाठी तंत्रज्ञानाची गंगा येत असेल तर एका देशाच्या प्रगतीसाठी हे अधिकच उत्तम आहे. त्यासाठी तेथील राज्यकर्त्यांची दूरदूष्टीचे कौतूकच केले पाहिजे.
येत्या 20-25 वर्षात पाकिस्तान मेड इन चायना बनण्याची शक्यता आहे. भारतातील तरूणांनी याचा जरूर विचार करावा. चायना कडून तंत्रज्ञान शिकून भारतामध्ये प्रत्येक गोष्ट मेड इन इंडिया कशी बनेल याचा...
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
Image result for china pak flag

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...