Thursday 9 July 2020

मी लहान वर्गाला शिकवते म्हणजे माझे प्रोमोशन का डीमोअशन?


ओशो मागील शतकातील अतिशय बुद्धिवान व्यक्तिमत्व अजून तरी या एकविसाव्या शतकात इतका बुद्धीमान व्यक्तिमत्व घडलेला नाही. मी ओशो खूप वाचतो आणि त्यांचा शिक्षण संदर्भातील दोन मोठे ग्रंथ जे दोन दोन हजार पानांचे आहेत. ते प्रत्येक वेळेस वाचले की नवा अर्थ निघतो.

ओशो एका ठिकाणी म्हणतात की लहान मुलांना शिकवण्यासाठी जेवढे उच्चशिक्षित टीचेर्स पाठवाल तेवढं ते लहान मूल घडेल. ते सर्व शिक्षक बालवाडी मध्ये शिकवायला पाठवा जे खूप शिकले आहे. प्री-प्रायमरी मध्ये Ph.D झालेले उच्चशिक्षित शिकवणारी टीचेर्स हवे.

विद्यार्थी जसजसा मोठा होतो तो स्वतः शिकत असतो म्हणून मोठ्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मॉन्टेसरी टीचर शिकवायला पाठवा कारण व्यक्तिमत्व विकास करायला काही राहिलेला नसतो सर्व लहानपणी होऊन जातात

आता तर मेंदू शास्त्राने हे सिद्ध पण केलेल आहे.

त्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतंय जेवढे विद्यार्थी लहान.. पहिली.. दुसरी.. तिसरी मध्ये शिकवणारे टीचर हे खूप शिकलेले.. सर्वात जास्त माहिती असलेले हवे.

या वयातच कुतूहल जागं होत असतात.

त्यामुळे जे शिक्षक लहान मुलांना शिकवायला तयार होतात ते खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडवतात. तुम्हाला जर देश घडवायचा असेल तर उच्चशिक्षित शिक्षकांनी लहान विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. कारण ते पाया बांधत असतात.. कळस तर कोणीही चढवतो.

त्यामुळे लहान मुलांना शिकवायला जाण म्हणजे तुमचं प्रमोशन असतं हा मुद्दा नीट समजून घ्या.

आपल्याकडे उलट असतं तुम्ही जेवढे जास्त शिकाल तेवढे तुम्ही मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यांना शिकवणं म्हणजे प्रतिष्ठेचं मानतात.

मी जर एक दिवसासाठी शिक्षण मंत्री झालो तर कॉलेजला मिळणारा पगार हा नर्सरी ते पाचवीच्या टीचर ला करेल आणि प्री प्रायमरी - प्रायमरी टीचर चा पगार हा प्रोफेसरला करेल आणि जेवढ्या लहान मुलांना तुम्ही शिकवला जाईल तेवढे तुमचा प्रमोशन असं जाहीर करेल.

सचिन उषा विलास जोशी

Sunday 5 July 2020

"शिक्षक गुरु का फक्त शिक्षक'"

आज गुरुपौर्णिमा
त्यानिमित्त माझे विचार मी मांडत आहे..
"शिक्षक गुरु का फक्त शिक्षक'"

गुरू
गुरु आयुष्य कसं जगावं ते सांगतो..
जो हरवल्याना रस्ता दाखवतो.
गुरु हा तत्वज्ञानी असतो.

प्रत्येक व्यक्ती स्वतःचे अध्यात्मे घेऊन जगत असतो.
हे अध्यात्मिक ज्ञान येथे गुरूकडून..

गुरु तुमच्या जीवनाची फिलॉसॉफी बनवतो. म्हणून आयुष्यात योग्य गुरु निवडणे आवश्यक. इथे निवड चुकली तर अडचण होऊ शकते..

गुरु कोणीही असू शकतो, मग तो आई-वडील, मित्र मैत्रीण, भाऊ, सहकारी, शिक्षक.. कोणीही..
ज्यावर तुम्ही विश्वास ठेवतात व त्यांच्या विचार तुम्ही स्वतःचे मानतात आणि ते तुमचे जीवनसूत्र बनवतात. ते प्रत्यक्ष तुमच्या जीवनात हवे असे नसते जसे ओशो पासून तर सध्याच्या तरुणांचा ताईत बनलेले संदीप माहेश्वरी.

शिक्षक
शिक्षक हा शिकवण्याचे कार्य करतो.
भारतीय तत्त्वज्ञानात गुरु आणि शिक्षक हे वेगळे समजले जातात.
आज शिक्षक दिन नाही.
शिक्षक विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवतो तर गुरु ते कौशल्य आयुष्यात कसे वापरायचे ते शिकवतो.

शिक्षक हा म्हणजे शाळेतला शिक्षक असा संकुचित शब्द नसून पालक सुद्धा शिक्षक असतात किंबहुना ते लहान मुलांच्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात

प्रश्न हा आहे टीचरला गुरू होता येते का?
तर नक्कीच हो!!

जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकवता शिकवता एक ऊर्जा निर्माण करू शकतो तो गुरु होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो.

ही ऊर्जा असते "तू करू शकतो" या मानस प्रक्रियेची..

शिक्षक तेव्हा गुरू होतो जेव्हा तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही तर शिक्षणाची तहान निर्माण करतो. आपल्याकडे म्हण आहे, घोड्याला तलावा जवळ नेता येते पण तलावातील पाणी पी असं करता येत नाही.
जर घोड्याला तहानच लागली नसेल तर तो का बरं पाणी पेईल? गुरु ती तहान निर्माण करतो.

आपल्या भारताला असे शिक्षण हवे आहे जे त्यांच्या त्यांच्या विषयात गुरु बनतील आणि विद्यार्थ्यांना जगण्याची प्रेरणा देतील.

विद्यार्थी आयुष्यात कधी नैराश्य अनुभवणार नाही आणि नैराश्य आलं तर त्यांना शिक्षकांचे ते शब्द आठवतील जे तुम्ही त्याला शाळेत शिकवता शिकवता सहज सांगितले होते. त्या क्षणी तुम्ही शिक्षक नाही.. गुरू झालात.

तमाम अश्या पालकांना, शिक्षकांना गुरुपौर्णिमा च्या शुभेच्छा
आणि पालक-शिक्षक ते गुरु होण्याच्या प्रक्रियेला ऑल द बेस्ट.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...