Sunday 15 March 2020

मुलं हिंसक का बनता आहेत?

शिक्षण अभ्यासक सचिन विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

आजकालच्या पालकांची शिक्षकांची एक महत्त्वाची चिंता असते ती म्हणजे सध्या मुलं खूप हिंसक बनत चालली आहे. शिक्षकांशी बोलावे तर त्यांचा सूर हाच असतो वर्गात मुलं शांत बसत नाही.. मारामाऱ्या तर असे करतात जसे की एखादी गॅंग चालवत आहे..

खरंच आजची पिढी एवढी हिंसक का बनते आहे? दर आठवड्याला एक तरी बातमी कॉलेजच्या तरुणांची मारामारीची असते. काही मुले तर आई-वडिलांना मारण्यापर्यंत जातात. या लेव्हलपर्यंत हिंसा वाढली आहे.. लहान मुलं का हिसंक बनत आहे याची कोणी विचार करतोय? याची काय कारणे असतील?

आजकालच्या मुलांना नैराश्य डिप्रेशन हे हाताळता येत नाही. त्यांना अपयश पचवताना येत नाही आणि सर्वात महत्वाचे भावना हाताळता येत नाही. या सर्वातून मुले हिंसक होत चाललेली आहे. हिंसक होणे म्हणजे आपल्या मनासारखेच होण्यासाठी अक्राळ तिक्राळ वागणे, कोणी मित्राने काही बोलले तर त्याला लाथाबुक्क्यांनी मारणे, आई-वडिलांनी एखादी गोष्ट करू नका म्हटलं तर घरातील वस्तूंची आदळआपट करणे, कधीकधी स्वतःला इजा करून घेणे.. थोडक्यात काय तर स्वतःचा रागा वर नियंत्रण न ठेवता येणे. रागाच्या भरात हिंसक पद्धतीने वागणे.

आता याची कारणे काय?
सर्वात महत्वाचे लहानपणापासून स्क्रीन टाईम जास्त असणे. लहान मुलांचे कार्टून जर पाहिले तर त्यात 80 टक्के हिंसा असते.. मोठ्या आवाजात ओरडणे असते.. व्हिडिओ गेम जर पाहिले तर 90 टक्के व्हिडीओ किंवा मोबाईल गेम हे मारामारीचे असतात. या सगळ्यात मुलांच्या मेंदूमध्ये मारामारीचे प्रोग्रामिंग होते. मोबाईल गेम खेळताना मी डोपामाइन नावाचे रसायन वाहतात. त्यांनी एक प्रकारची नशा येत असते. या सगळ्यातून मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक हालचालीवर मोठा परिणाम होतो. मुलं हायपर बनतात.

मुलांमध्ये आधीच प्रचंड ऊर्जा असते, ही ऊर्जा योग्य पद्धतीने बाहेर खर्च होणे आवश्यक असते नाहीतर मुले चिडचडे, रागीट बनतात. ही ऊर्जा बाहेर पडते ती भरपूर मैदानी खेळ खेळल्याने. जेव्हा मुले खेळ खेळतात तेव्हा ही ऊर्जा योग्य मार्गाने खर्च होते पण आजकालचे मुलं हे ग्राउंडवर दिसतच नाही. एक तर आजूबाजूला ग्राउंड शिल्लक नाहीत..असले तर ते व्यवस्थित नाही आणि व्यवस्थित असले तरी मुलं मोबाईल खेळत पडलेले आहे.

मुलं हिंसक बनवण्याची अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे घरातील सर्व लोकांची एकमेकांशी संवाद नसणे. आईवडिलांची सातत्याने भांडणे, सासू-सुनेचे वाद, या सर्वातून आईची मुलांवर होणारे चिडचिड.. वडिलांचा ताणतणाव व्यवस्थापन जमत नसल्याने मुलांवर होणारी चिडचिड.. या आणि अशा अनेक प्रकारे मुलांमध्ये मानसिक बदल होतात आणि त्यांच्या वागणुकी मध्ये हिंसा वाढते.

नेमके याच्याविरुद्ध महत्त्वाचे कारण ज्याने मुले हिंसक बनतात ते म्हणजे एकुलते एक बाळ आणि अतिलाड - आंधळे प्रेम. मुलांच्या प्रत्येक चुकीच्या वर्तणुकीला कळत-नकळत संमती देणे.. मुलं कशीही वागू, कशी पण उद्धट बोलो, कोणालाही मारो.. शाळेतील येणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे किंवा दुसरे मूलचं चुकीचे.. शिक्षक चुकीचे वागले असतील.. असे गृहीत धरून मुलांच्या चुका पदराखाली घेणे. "माझा मुलगा/माझी मुलगी चुकीची वागुच शकत नाही", या गृहितावर वरून मुलांच्या अयोग्य वर्तनला साथ देणे.. या सर्वातून एक दिवस तो / ती हिंसक बनते. तेव्हा पालकांचे डोळे उघडतात पण तेव्हा वेळ निघून गेली असते.

बरेच वेळा आपण मुलांना वाढवताना त्यांना प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध करून देतो. "मागितलं की मिळतं", असे पालकत्व असते. यातून नकार ऐकण्याची सवय राहत नाही. नकार ऐकण्याची सवय नसल्याने जेव्हा नकार मिळतो तेव्हा प्रचंड प्रचंड रागातून हिंसक प्रवृत्ती जन्म घेते. एकतर्फी प्रेमामध्ये मुलीचा नकार पचवता येत नाही व त्यातून मुलीवर हल्ला किंवा स्वतःच्या जीवाला काही करून घेणे किंवा परीक्षेत अपेक्षा प्रमाणे मार्क नाही मिळणे म्हणून आत्महत्या एक त्याचीच काही उदाहरणे.

सध्या लहान मुलांच्या हातात लवकर मोबाईल आला. मोबाईलवर पिक्चर पाहणे हे घराघरात चालू आहे. साउथ फिल्म हिंदी मधून डब केलेली इतके असतात की त्या फिल्मची नशाच झालेले कुटुंब मी पाहिलेले आहे. साउथ फिल्म हिंसेने भरलेली असतात. या सगळ्यातून मुलं शिकतात आणि व्यक्तिमत्व घडण्याच्या काळात असे चुकीचे हिरो यांच्या मनात घर करून बसतात.

थोडक्यात काय तर अति हिंसक फिल्म, सिरीयल, मोबाईल गेम, आई-वडिलांची भांडण, घरातील तुटलेला संवाद, पालकांचे ताणतणाव, शाळेतून शिक्षेचे महत्व कमी होणे, मैदानी खेळ बंद होणे, पालकांचे अति लाड किंवा अतिकडक पणा, अति शिस्त असे अनेक कारणाने आजकालची पिढी हिंसक बनत चालली आहे. त्यांचे हिरोगिरी चे आदर्श बदलत चालले आहे. पालकांचा भौतिक सुख समृद्धी कडे असलेले झुकते माप, तुटत असलेली कुटुंब व्यवस्था यातून मुलांकडे होणारे दुर्लक्ष. असे अनेक कारणे मुलांच्या हिंसक वृत्तीला चालना देत आहेत.

या सर्वातून पालकांना आपल्या मुलांना वाचवायचे असेल तर वरच्या कृती, वर्तणूक आपल्या घरात होणार नाही याची काळजी घेण. म्हणजेच काय तर मुलांना मैदानी खेळ भरपूर खेळू देणे, स्क्रीन टाईम कमी करणे, मोबाईल गेम पब्जी गेम हे बंद करणे, साउथ फिल्म बंद करणे, घरातील वातावरण आनंददायी ठेवणे, मुलांशी भरपूर गप्पा मारणे, शाळेतील शिक्षकांचा सन्मान ठेवणे, त्यांनी जर शिक्षा केली तर ती मुलांना भोगू देणे. विचार केला तर अतिशय सोप्या गोष्टी आहे पण आचरणात आणण्यासाठी पालकांनी मनावर घेणे आवश्यक आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



1 comment:

Unknown said...

Thankyou Sachin Sir for this post we had a word last week about why kids become so hyper nowadays and got the answer in this blog. Have Shared to my family members and friends and Sure thus will help a lot. Thank you once again.

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...